रविवार, डिसेंबर ११, २०१६

‘विकासाच्या गाड्यावर कर्जाचा बोजा’

 

विकासाच्या गाड्यावर कर्जाचा बोजा, धार्मिक स्थळांना सढळ मदतमराठी विश्वकोष व शासकिय मुद्रणालयाचे काम 5 वर्षे रखडले, या आशयाच्या बातम्या शनिवार 18/5 च्या अंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या बघीतल्या तर शासनाने केवळ लोकानुनयालाच महत्व दिल्याचे दिसेल. तेही धार्मिक स्थळांना सहा कोटी(सहा कि. मी. च्या परिसरातील तीन स्थळांना प्रत्येकी दोन कोटी)रूपयांची खिरापत वाटतांना शासनाने मराठी विश्वकोषाला-जे महाराष्ट्राच्या व मराठी भाषेच्या ईतिहास व ज्ञानाला, माहिती व अर्थाला वाहिलेले आहे-त्याला अडगळीतच टाकलेले जाणवेल. मुळात धार्मिक स्थऴांना शासनाने मदत देऊच नये.कोणत्याही धार्मिक क्षेत्रांना विकासात्मक(?) व्याप वाढवायचा असेल तर अशा धार्मिक स्थानांना देणगीपोटी (लोकांकडून)करोडो रूपये मिळतच असतात,त्याचा त्यांनी वापर करावा.अशा ठिकाणी रस्ते, पाणी यांची आवश्यक तितकी सोय करावी मात्र लोकानुनयासाठी करदात्यांचा पैसा एकमेकाच्या ईर्षेवर स्वतःची संस्थाने निर्माण करणाऱया व धार्मिकतेची दुकाने मांडणाऱ्यांवर ऊधळू नये.विकासकामे करताना राज्यावर कर्ज काढायची वेळ येत असेल तर त्याचा वापर धार्मिकतेचा वापर करणाऱयां तथाकथित स्थळांवर करू नये.पंचवीस हजार कोटींचं कर्ज शासन काढत असेल तर त्याचा वापर अनुत्पादक गोष्टींवर करणे हे ऋण काढून सण साजरा केल्यासारखे होईल हे खरेच.

      दुष्काळाच्या खाईत रखरखणाऱयालोकांना पिण्याचे पाणी दररोज मुबलक उपलब्ध होईल,गाव वाड्यांवर कायमस्वरूपी स्ट्रीटलाईट लागतील,रस्त्यानी साऱया वाड्या वस्त्या जोडल्या जातील यासाठी कर्ज काढून विकास करता आला तर ते योग्य होईल. मात्र पंचवीस हजार कोटींचं कर्ज काढून धार्मिकता जोपासायची काही गरज नाही. त्यापेक्षा महाराष्ट्राचं आणि मराठी भाषेच्या अभ्युदयात सिंहाचा वाटा उचलणाऱया मराठी विश्वकोषाची ईमारत, छापखाना व छपाइ-प्रसिद्धीसाठी काही कोटी रक्कम दिली तर ते योग्य व विकासाभिमुख होईल.

शुक्रवार, ऑक्टोबर ०७, २०१६

घुसमट

घुसमट

कुणीतरी एकेदिवशी स्वतःच्या आयुष्याचा दिवा मालवून टाकते. मग आपण ठाम आणि सोपे निष्कर्ष काढतो. जसे- दारिद्र्याला कंटाळून आत्महत्या, प्रेमभंगापायी आत्महत्या,नवऱयाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या,नोकरीतील अन्यायाने कंटाळून आत्महत्या, परिक्षेत नापास झाल्यामुळे वा होण्याच्या भितीमुळे आत्महत्या.
आणि मग चर्चा- आत्महत्या करणारी माणसे दुबळ्या मनाची असतात,म्हणजे आपण समर्थ मनाचे असतो.मन दुबळे होते तर मग इतकी वर्षे त्याने जगण्याला कसे तोंड दिले.? आत्महत्या करने दुबळ्या मनाचे लक्षण मानले तर स्वतःचा बळी घेणे हे काय सोपे काम आहे? केवळ कल्पनेनेही समर्थ मनाच्या आपल्याला घाबरे व्हायला होते. मग कल्पनेनेही स्विकारायला समर्थ मनाला जे जड वाटते ते दुबळ्या मनाने कसे केले असेल असा प्रश्र्न निर्माण होतो.
‘ नैराश्याच्या प्रवासातले अखेरचे स्टेशन म्हणजे आत्महत्या ’ असे मानसशास्त्रज्ञ मानातात. आणि फ्रॉइडच्यामते ‘ आत वळलेला राग म्हणजे नैराश्य.’ मनासारखे काही होइनासे झाले की राग येतो.राग साचत जातो.तो कोनावर काढावा हे समजत नाही.शेवटी तो आपल्यावरच काढल्याशिवाय पर्याय नसतो.त्यामुळे स्वतःला निरूपयोगी, बिनकामाचे, अडगळ, क्षुद्र इ. समजण्याकडे कल होतो.या जगात जगण्याच्या लायकीचे आपण नाही असे वाटून तिरस्कार, किळस करण्याकडे ओढा होतो.बाहेरची व आतली परिस्थिती एकच वाटू लागते.या अवस्थेत बाहेरून या जगात आहे वाटणारी व्यक्ति मनाने वेगळ्याच जगात वावरत असते.मग अशा अंधाऱया गुहेतल्या प्रवासाचे वेडच व्यक्तिला लागते.
दैंनदिन जिवनातले मंदावने, कमी झालेले व तुसडे वाटनारे बोलने चालने ही लक्षणे दिसू लागतात.घुसमट वाढते, इतरांना लक्ष द्यायला वेळ नसतो, अंधारी गुहा आणखी अरूंद होते,बाहेर पडण्याची वाट सापडत नाही,धीर राहत नाही,आणि यातून सुटण्याची घाई होते, काहीतरी घडते..कुणाचे बोलणे वागणे घाव घालते.ऊपेक्षा आणि अपमान जिव्हरी लागतो,जगण्याचा हेतू संपतो... आत्महत्येचा हाच तो क्षण असतो, धुसमटवनाऱया अर्थहिन अस्तित्वाचा शेवट.
सगळे घडल्यावर इतरांना कळते, धक्का बसतो, आश्चर्य वाटते, मग निमित्त शोधले जाते, ठाम निष्कर्ष काढले जातात. पण आत्महत्येचा प्रवास खुप आधीपासून सुरू झालेला असतो.खुप काही सोसून झालेले असते आणि शेवटी काहितरी निमित्त होते – मात्र ते कारण नसते.
याविषयावर जॉर्ज शेव कोल्ट यांचे एक छानसे पुस्तक आहे – दि एनिग्मा ऑफ सुसाइड्

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ

ग्रंथप्रामाण्याची कालसापेक्षता ...मूलगूनाचे बदलते संदर्भ सगळ्याच तीर्थंकरांचा उपदेश एकसारखाच असेल का...